Pm Kisan Yojana 22th Hapta News: शेतामध्ये रब्बीची कामं सुरू असतात, हवेतील थंडावा वाढलेला असतो, आणि अशा दिवसात गावातल्या चावडीत, चहाच्या टपऱ्यांवर, बाजारात एका बातमीची जोरात चर्चा सुरू होते सरकार पीएम किसानची रक्कम वाढवतेय म्हणे! कुणी म्हणतं नऊ हजार होणार, कुणी म्हणतं बारा हजार होणार, तर कुणी म्हणतं हे सगळं अफवा आहे. पण सत्य एवढंच की, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जवळ आला की शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण नेहमीच पेटतात. Pm Kisan Yojana 22th Hapta News
आताच्या घडीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. तीन हप्त्यात २-२ हजार रुपये थेट खात्यावर येतात. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं बजेट ह्या पैशावर उभं राहतं खतं, बियाणं, औषधं, घरातली एखादी तातडीची गरज… छोट्या-मोठ्या खर्चात हा हप्ता खरा दिलासा बनतो.
मात्र ही रक्कम योजना सुरू झालेल्या दिवसापासून आजपर्यंत कधीच वाढलेली नाही. महागाई वाढली, शेतीचा खर्च दुप्पट झाला, परंतु हप्ता तसाच राहिल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढत गेली. ह्याच पार्श्वभूमीवर काही वृत्तांतून माहिती समोर येत आहे की, मोदी सरकार पीएम किसानची रक्कम ६ हजारांवरून ९ हजार पर्यंत वाढवण्याचा गंभीर विचार करत आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी तर १२ हजारांपर्यंत रक्कम वाढवण्याची चर्चाही केली जात आहे.
जर असे झालं तर एका हप्त्यात ३ ते ४ हजार रुपये मिळतील म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडेल असा आधार. गावात कुणी म्हणतंय, चार हजार एकदम आले तर खताचा अर्धा खर्च तरी भरून निघेल, तर कुणी म्हणतंय, सरकारने यावेळी शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष देणार का, ते बजेटमध्ये कळेल.
फेब्रुवारी 2026 मध्ये संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आणि त्याआधीच अर्थ मंत्रालयात 2026–27 चा बजेट तयार करण्याची हालचाल सुरू झाली आहे. शेतकरी हिताच्या घोषणा होण्याची शक्यता अधिक असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मागच्या वर्षीही अशीच अपेक्षा होती, पण रक्कम वाढ झाली नाही. म्हणून यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता थोडी जास्तच आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना खूप महत्त्वाची आहे कारण ९ कोटींहून अधिक कुटुंबांचा खर्च या पैशाने थोडाफार सावरण्यात मदत होते. नुकताच २१ वा हप्ता खात्यावर आला आणि आता सर्वांच्या नजरा २२व्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत. पण हप्त्यापेक्षा जास्त चर्चा यंदा रक्कम वाढणार का? या प्रश्नावरच आहे.
एका बाजूला राजकारण तापलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी वर्ग सरकारकडून काहीतरी मोठी घोषणा येण्याची वाट बघत आहे. कुटुंबाच्या गरजा, शेतीचा वाढता खर्च आणि महागाईच्या चटके पाहता, ही रक्कम वाढली तर ग्रामीण कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल हे नक्की. आता पाहायचं इतकंच सरकार ह्या वेळी शेतकऱ्यांना नववर्षाची खर्या अर्थाने भेट देते का?